रसायनमुक्त नैसर्गिक शेतीच्या प्रचाराची सरकारची योजना

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीचा प्रचार करण्याची सरकारची योजना असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करतेवेळी नमूद केले. त्याचवेळी खत अनुदानात मागील वर्षीच्या अंदाजाच्या तुलनेत एक चतुर्थांशाने घट केली.


१ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रिय अर्थसंकल्प सादर करताना सितारामन म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या ५ किमी जोडमार्गात येणाऱ्या शेतकरी जमिनींवर लक्ष केंद्रित करत देशभर रसायनमुक्त नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यात येणार आहे. त्याशिवाय, नैसर्गिक, शून्य-बजेट आणि सेंद्रिय शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापनाची गरज पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांत सुधारीत अभ्यासक्रमाला राज्यांनी प्रोत्साहन देणे अपेक्षित असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.


काही प्रकारांपैकी भारतीय कृषी क्षेत्र हे महासाथीच्या अनिश्चिततेत देखील भक्कम राहिले. शेती हा भारताचा पुनरप्राप्ती प्रक्रिया आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक असल्याचे लक्षात घेऊन सरकारने या केंद्रिय अर्थसंकल्प २०२२ दरम्यान क्षेत्राला चालना दिल्याचे दिसून येते. “सर्वसमावेशी विकास” स्तंभातंर्गत शेती हा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे सरकारला जाणवते.


शेती क्षेत्र भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, हे क्षेत्र नेहमीच केंद्रिय अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू राहणार आहे. वर चर्चा करण्यात आलेल्या सरकारी उपक्रमाचे या क्षेत्रात बहुआयामी परिणाम होतील व भारताच्या यशोगाथेत महत्त्वपूर्ण योगदान राहील. केंद्राने मंगळवारी केंद्रिय पर्यावरण मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी वाढ केली.

Comments
Add Comment

आता लोकल गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार; ३ महिने राहणार हे' प्लॅटफॉर्म बंद

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एका मोठ्या जम्बो ब्लॉक चा

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

Rohit Shetty : बॉलिवूड हादरलं! ॲक्शन किंग अन् दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार; तो आला अन्...थेट

मुंबई : बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर

वाढत्या वायुप्रदूषणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या

मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि