रसायनमुक्त नैसर्गिक शेतीच्या प्रचाराची सरकारची योजना

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीचा प्रचार करण्याची सरकारची योजना असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करतेवेळी नमूद केले. त्याचवेळी खत अनुदानात मागील वर्षीच्या अंदाजाच्या तुलनेत एक चतुर्थांशाने घट केली.


१ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रिय अर्थसंकल्प सादर करताना सितारामन म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या ५ किमी जोडमार्गात येणाऱ्या शेतकरी जमिनींवर लक्ष केंद्रित करत देशभर रसायनमुक्त नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यात येणार आहे. त्याशिवाय, नैसर्गिक, शून्य-बजेट आणि सेंद्रिय शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापनाची गरज पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांत सुधारीत अभ्यासक्रमाला राज्यांनी प्रोत्साहन देणे अपेक्षित असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.


काही प्रकारांपैकी भारतीय कृषी क्षेत्र हे महासाथीच्या अनिश्चिततेत देखील भक्कम राहिले. शेती हा भारताचा पुनरप्राप्ती प्रक्रिया आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक असल्याचे लक्षात घेऊन सरकारने या केंद्रिय अर्थसंकल्प २०२२ दरम्यान क्षेत्राला चालना दिल्याचे दिसून येते. “सर्वसमावेशी विकास” स्तंभातंर्गत शेती हा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे सरकारला जाणवते.


शेती क्षेत्र भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, हे क्षेत्र नेहमीच केंद्रिय अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू राहणार आहे. वर चर्चा करण्यात आलेल्या सरकारी उपक्रमाचे या क्षेत्रात बहुआयामी परिणाम होतील व भारताच्या यशोगाथेत महत्त्वपूर्ण योगदान राहील. केंद्राने मंगळवारी केंद्रिय पर्यावरण मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी वाढ केली.

Comments
Add Comment

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली