जिल्हा परिषद विकास आराखडा २०२२-२३; पालघर जिल्हा आघाडीवर

  36

पालघर (प्रतिनिधी) : १५व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा परिषद विकास आराखडा २०२२-२३ विहित मुदतीमध्ये अपलोड करायच्या शासन सूचनेनुसार तयार करून अपलोड करण्यामध्ये राज्यभरातून पालघर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषद नियोजन समितीची मंजुरी घेऊन आराखडा तयार केला व इ-ग्राम स्वराज प्रणालीवर अपलोड केला.


दि. १ नोव्हेंबर २०२१ शासन निर्णयान्वये सुधारित मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा परिषद विकास आराखड्याची विविध कार्यपद्धती राबवून प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. या आनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा परिषद नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीत अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी १५व्या वित्त अयोगामधील बंधित व अबंधित निधीची मर्यादा लक्षात घेऊन आराखड्यातील कामांचा प्राधान्यक्रम गरज लक्षात घेऊन कामे पर्यावरणपूरक होतील, याविषयी मार्गदर्शन केले. दुबार कामे किंवा एकाच प्रकारची कामे टाळता येतील, याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.


तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आराखड्याचे महत्त्व पटवून देत असताना उपलब्ध होणाऱ्या निधीमधून चांगल्या प्रतीची कामे होतील. तसेच निधीचा सदुपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार आराखड्याचे नियोजन करत असताना राज्य शासनाच्या यंत्रणांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश आराखड्यामध्ये करण्याबाबत सूचना राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या. यासंबंधी सदस्य व लोकप्रतिनिधी यांना आवश्यक शासननिर्णय मार्गदर्शक सूचना आवश्यकतेप्रमाणे देण्याची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्वसमावेशक व सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आला आहे.


१५व्या वित्त आयोग निधीबाबत पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या विभागाचा १५व्या वित्त आयोगाचा २०२२-२३चा निधी गावोगावी जाऊन स्वच्छता व पाणी संदर्भातील विशेष कामांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा आराखडा पूर्ण झाला असून पुढे निधी उपलब्ध होऊन अनेक कामे लोकप्रतिनिधींच्या मार्फत होणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी केले आहे.

Comments
Add Comment

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील