घणसोलीत विजेचा खेळखंडोबा

  59

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील घणसोली परिसरात भर उन्हाळ्यामध्ये गर्मीच्या कालावधीत मागील तीन दिवसांपासून अनेकदा वीज खंडित होत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.


घणसोली विभाग कार्यालय परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार नवीन नाही. मागील वर्षीसुद्धा मार्चनंतर उन्हाळ्यास सुरुवात झाली की, त्यानंतर वीज गायब होण्याचे प्रकार नियमित होत होते; परंतु यावर्षीचा उन्हाळा सुरू होऊन गर्मीस प्रारंभ झाल्यावर पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व वाहिन्यांवर ताण पडत असल्याने विद्युत वाहिन्या तुटून, वीज गुल होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.


बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी अनेकदा वीज खंडित झाली. आजच्या घडीला उष्णतेचे प्रमाण भयानक असल्याने घामाने नागरिक भिजून जात आहेत. त्यातच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत.


उष्णता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यंत्रणेवर दाब जादा प्रमाणात पडतो. त्यामुळे यंत्रणा खराब होत आहे.


- बोधनकर, अभियंता, महावितरण.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता