‘त्या’ कोरोना कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या कामगारांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. चौथ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानुसार सुमारे ७०९ कामगारांचे आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, शहर स्वच्छता आदींसह इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली; परंतु पुढील दोन महिन्यांसाठीच त्यांचे हे पुनर्वसन करण्यात आल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.


कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत महापालिकेच्या विविध कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर काही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. तथापि, आता कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने इतर कामगारांना पुढील सहा महिने वाढवून द्यावेत, अशी मागणी करत माजी महापौर नरेश म्हस्के व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला होकार देत पालिकेनेही आता या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु काम न करता पगार कसा देणार असा प्रश्न पालिकेला पडला होता.


त्यामुळे आता सुमारे ७०९ कामगारांना महापालिकेच्या इतर विभागांत स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वॉर्ड बॉय, आया व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या आनुषगांने घेण्यात आलेल्या कंत्राटी स्वरूपातील कामगारांना पुढील सहा महिन्यांसाठी ठेवावे, अशी मागणी झाली होती. त्यानुसार आता यातील १२५ कामगारांना शहर स्वच्छेतेच्या मोहीमेत उतरवण्यात आले आहे. काही कामगारांना स्मशानभूमी, आरोग्य केंद्र व इतर ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली; परंतु पुढील दोन महिन्यांसाठी या कामगारांचे पुनर्वसन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील माजी आमदार, अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचे

BSNL युजर्ससाठी खुशखबर; नेटवर्क नसले तरी करता येतील कॉल्स आणि मेसेज

मुंबई : मोबाईल नेटवर्क नसले तरी आता कॉल आणि मेसेज करता येणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचताय. नवीन वर्षाच्या

कोणतीही चूक, निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन करणार नाही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आचारसंहितेच्‍या कालावधीत प्रत्येक कृतीची नियमांनुसार अचूक व वेळेत नोंद घेणे बंधनकारक

BMC Election 2026 : वांद्रेत मनसेला खिंडार! 'मशाली'ला विरोध करत निष्ठावंतांचा भाजपमध्ये प्रवेश; ११ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष शर्थीचे प्रयत्न करत

Mumbai Crime... मुंबईत खळबळ! न्यू इअर पार्टी साठी घरी बोलावून, गर्लफ्रेंडने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टलाच...

मुंबई : मुंबईत नववर्षाच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. सांताक्रूझ पूर्व येथील कालिना परिसरात एका महिलेने

UTA APP... UTS अॅपला रामराम! मुंबई लोकल प्रवाशांसाठी 'हे' नवे ॲप, एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व रेल्वे सेवा

मुंबई : दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच