‘त्या’ कोरोना कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन

  89

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या कामगारांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. चौथ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानुसार सुमारे ७०९ कामगारांचे आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, शहर स्वच्छता आदींसह इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली; परंतु पुढील दोन महिन्यांसाठीच त्यांचे हे पुनर्वसन करण्यात आल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.


कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत महापालिकेच्या विविध कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर काही कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. तथापि, आता कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने इतर कामगारांना पुढील सहा महिने वाढवून द्यावेत, अशी मागणी करत माजी महापौर नरेश म्हस्के व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला होकार देत पालिकेनेही आता या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु काम न करता पगार कसा देणार असा प्रश्न पालिकेला पडला होता.


त्यामुळे आता सुमारे ७०९ कामगारांना महापालिकेच्या इतर विभागांत स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वॉर्ड बॉय, आया व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या आनुषगांने घेण्यात आलेल्या कंत्राटी स्वरूपातील कामगारांना पुढील सहा महिन्यांसाठी ठेवावे, अशी मागणी झाली होती. त्यानुसार आता यातील १२५ कामगारांना शहर स्वच्छेतेच्या मोहीमेत उतरवण्यात आले आहे. काही कामगारांना स्मशानभूमी, आरोग्य केंद्र व इतर ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली; परंतु पुढील दोन महिन्यांसाठी या कामगारांचे पुनर्वसन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र