मुंबईकर शंभर टक्के लसवंत

  56

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला शंभर टक्के लसवंत करण्याचे उद्दिष्टे मुंबईत महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यामुळे मुंबईत लसीकरण पूर्ण करण्याला पालिकेला यश आले आहे. मुंबईतील दोन्ही मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या आता १०० टक्के झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ९२ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या आहेत.


दरम्यान, मुंबई महापालिकेने पहिल्या लसमात्रेचे तब्बल १११ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून दुसरी लस घेणाऱ्या नागरिकांचे उद्दीष्ट गाठता येत नव्हते. २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवलेले असतानाही पालिकेला हे तेव्हा गाठता आले नव्हते.


दरम्यान एप्रिल महिन्यात हे उद्दिष्ट गाठले असून आतापर्यंत १ कोटी २ लाख ९६ हजारांहून अधिक नागरिकांनी म्हणजेच १११ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर ९२ लाख ४२ हजार ८८८ नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.



५१ नव्या रुग्णांची नोंद


बुधवारी दिवसभरात मुंबईत ५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांत ३८ जण बरे झाले आहेत. बरे झालेले एकूण रुग्णांची संख्या १०,३८,३९४ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. दरम्यान मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण २८३ इतकी आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर १८,२८४ दिवस झाला आहे. मुंबईत लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे.


दरम्यान राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथील केले आहेत. तसेच सध्या १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जात आहे. त्यालाही वेग आला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत कोरोना नियंत्रणात आहे. मास्कसक्तीही शिथील करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता