पालिकेतील कामे मर्जीतील ठेकेदारांना

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी शिवसेनेसह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली असून पालिकेतील कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर आपल्या मर्जीतील ठेकेदार व कंपन्याना कंत्राट मिळाले पाहिजे याची संपूर्ण सोय प्रशासनाला दबावात आणून केली जाते. तो प्रस्तावच या पद्धतीने तयार केला जातो. इतर कंपन्या त्यात सहभागी होतील पण पात्र ठरणार नाहीत,” असा आरोप देखील कोटेचा यांनी केला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी तसाच डाव आता परत १४०० ईलेक्ट्रीक बसेस खरेदी कंत्राटमध्ये अवलंबला आहे असेही कोटेचा म्हणाले.


कोटेचा म्हणाले की, एकीकडे केंद्र सरकारचे २३४ कोटी खात्यात जमा झाल्यानंतर सुद्धा नेहमीप्रमाणे केंद्र सरकार पैसा देत नाही म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे टक्केवारीसाठी लगबगीने सोयीस्कर निविदा काढायच्या. पण लक्षात ठेवा, भाजप असे होऊ देणार नाही. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून मिळालेल्या केंद्र सरकारच्या निधीवरील टक्केवारीवर डल्ला मारू देणार नाही. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सिव्हीसी आणि कॅग यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत,”असे कोटेचा म्हणाले.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना