इम्रान खान यांना धमकीचे पत्र मिळालेच नाही

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी दावा केला आहे.


पाकिस्तानचे इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रीण फराह खान देश सोडून परदेशात पळून गेली असून जर पाकिस्तानात नवं सरकार स्थापन झाले, तर तिला अटक होऊ शकते, अशा बातम्याही येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे, फराह खान पाकिस्तानातून जवळपास ९० हजार डॉलर घेऊन पळून गेली आहे. त्यातच आता इम्रान खान यांच्या धमकीच्या पत्राबाबत पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी हा दावा केला.


पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ज्या पत्राच्या मदतीने परदेशी षडयंत्राचा आरोप केला होता, ते पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केले होते. म्हणजेच, इम्रान खान यांनी स्वतःच त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पत्र लिहून घेतले, जेणेकरून 'षडयंत्र' सांगून जनतेची दिशाभूल केली जाऊ शकेल, असे मरियम नवाज यांनी म्हटले अाहे. वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान कथित धमकीचं पत्र का दाखवत नाहीत? असा सवाल नवाज यांनी केला आहे.


दरम्यान इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे मरियम नवाज यांनी सांगितले आहे. इम्रान खान यांनी स्वत: एक पत्र तयार करून घेतलं आणि परकीय कारस्थानाचा आरोप करून देशातील जनतेची दिशाभूल केली असल्याचा दावा मरियम नवाज यांनी केला आहे.


इम्रान खान यांच्याकडून सांगण्यात आले होते की, अमेरिकेत तैनात पाकिस्तानी राजदूताला हे धमकीचे पत्र मिळाले होते, मग त्यांना ब्रसेल्सला का पाठवले? राजदूताला सर्वोच्च न्यायालयात हजर करावे, अशी आपली मागणी असल्याचेही मरियम नवाज यांनी लाहोरमधील पत्रकार परिषदेत सांगितले.

Comments
Add Comment

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना

पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस बॉम्बस्फोट करुन उडवण्याचा प्रयत्न, बलुचिस्तानमध्ये रेल्वे ट्रॅकचे नुकसान

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधून एक धक्कादायक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जाफर एक्सप्रेस या

बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या! १० आरोपींना अटक, युनुस सरकार काय निर्णय घेणार ?

ढाका: बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या घटनेनंतर, आतापर्यंत दहा