मुक्या प्राण्यांच्या झुंजींना बंदी घालण्याची मागणी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या मुक्या प्राण्यांच्या झुंजींना पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी गोवंश रक्षण समिती आणि महाराष्ट्र लोकाधिकार समिती सदस्य अविनाश पराडकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. दोन दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील एका गावात झालेल्या बैलांच्या झुंजीत एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.


कुडाळ पोलिसांना निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्या प्राण्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बैलांच्या एका जीवघेण्या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या झुंजीत एका बैलाला अप जीव गमवावा लागला. त्या बैलाने आपला जीव गमवावा लागल्यानंतरही काही विकृत लोक आपल्या तितक्याच विकृत आनंदासाठी त्या बैलाला त्रास देत असल्याचे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून झुंजींच्या या प्रकारावर चोहीबाजुंनी टीका होत आहे. या प्रकारामुळे आपल्या शांतीप्रिय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लौकिकाला अक्षरशः काळिमा फासला गेला आहे. आपल्या जिल्ह्यात इतकी हिंस्त्र आणि क्रूर घटना आजपर्यंत कधीही घडलेली नाही. मात्र या घटनेने सर्वांचीच मान शरमेने खाली गेली आहे.


जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरु असलेले हे जीवघेणे प्रकार त्वरित थांबवून असा प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणीनिवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्राणी क्लेश निवारण समिती, मालवण पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या

मराठवाड्यात मविआला मोठा धक्का; परभणी-धाराशिवमध्ये महायुतीचा डंका

धाराशिव : राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन

Maharashtra Local Body Elections : "विरोधकांचे 'नरेटिव्ह' भुईसपाट..."; भाजपच्या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर सणसणीत टोलेबाजी!

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पुन्हा एकदा