मुक्या प्राण्यांच्या झुंजींना बंदी घालण्याची मागणी

  126

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या मुक्या प्राण्यांच्या झुंजींना पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी गोवंश रक्षण समिती आणि महाराष्ट्र लोकाधिकार समिती सदस्य अविनाश पराडकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले. दोन दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील एका गावात झालेल्या बैलांच्या झुंजीत एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.


कुडाळ पोलिसांना निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्या प्राण्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बैलांच्या एका जीवघेण्या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या झुंजीत एका बैलाला अप जीव गमवावा लागला. त्या बैलाने आपला जीव गमवावा लागल्यानंतरही काही विकृत लोक आपल्या तितक्याच विकृत आनंदासाठी त्या बैलाला त्रास देत असल्याचे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून झुंजींच्या या प्रकारावर चोहीबाजुंनी टीका होत आहे. या प्रकारामुळे आपल्या शांतीप्रिय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लौकिकाला अक्षरशः काळिमा फासला गेला आहे. आपल्या जिल्ह्यात इतकी हिंस्त्र आणि क्रूर घटना आजपर्यंत कधीही घडलेली नाही. मात्र या घटनेने सर्वांचीच मान शरमेने खाली गेली आहे.


जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरु असलेले हे जीवघेणे प्रकार त्वरित थांबवून असा प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणीनिवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्राणी क्लेश निवारण समिती, मालवण पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची