रिफायनरी प्रकल्प तिथेच होणार - नितेश राणे

  59

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूरमधील बारसू येथील जागेचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र नाणार वगळून जिथे समर्थन आहे त्याच जागेवर रिफायनरी होणार असल्याचा दावा केला आहे.


नाणारच्या नागरिकांचा रिफायनरीला विरोध आहे. यामुळे नाणार वगळून जिथे समर्थन आहे, त्याच जागेवर रिफायनरी होणार आहे, अशी माहिती नितेश राणेंनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि रिफायनरीशी संबंधित सर्व लोकप्रतिधी या बैठकीत असतील, अशी माहिती नितेश राणेंनी दिली.


रिफायनरी प्रकल्पाला आता कोणाचाही विरोध राहिलेला नाही. बारसू वैगरे गावात रिफायनरी होणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या काही नेत्यांनी आणि राज्य सरकारमधील काही मंत्र्यानी सुरू केली आहे. ती फक्त त्यांच्या पुरतीच मर्यादित आहे. नाणार नाव ऐवजी ग्रीन रिफायनरी असा उल्लेख असेल, असे नितेश राणे म्हणाले.


रिफायनरी संबंधित जेवढे पण लोकं आहेत, यांची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री राणे साहेबही असतील. आम्ही पण कोकणातून दिल्लीला जाणार आहोत. संयुक्त बैठक होणार आहे. नेमकी जागा कुठे ठरणार आणि कोणाकोणाचं समर्थन आहे. आणि कुठल्या गोष्टीची प्रकल्पाला गरज आहे, या सर्व मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल आणि रिफायनरीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे नितेश राणे म्हणाले. नाणारचा विरोध असल्याने आम्ही आता नाणार रिफायनरी म्हणणार नाही. त्याल केंद्र सरकारच्या नियोजित प्रकल्पानुसार ग्रीन रिफायनरी असे म्हणणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.


प्रमोद जठार यांच्या नेतृत्वात लवकरच आम्ही दिल्लीला जाणार आहोत. देवेंद्र फडणवीस, राणे साहेब आणि सर्व संबंधित मंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच बैठक होईल आणि त्याची माहिती देण्यात येईल, असे नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण