सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करणे आवश्यक : नारायण राणे

Share

नवी दिल्ली : देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकासाचे वेगवर्धक असून त्यांना बळकट करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयाय) यांच्या वतीने आयोजित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग स्पर्धात्मकता आणि विकास या विषयावरील दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते . यावेळी त्यांनी देशांतर्गत उत्पादनात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या महत्त्वावर भर दिला. बऱ्याच काळापासून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग किमान संसाधनांमध्ये काम करत आहेत आणि तरीही देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यामुळे हे आपल्या हातात असलेले, विकासाला वेग देणारे उद्योगक्षेत्र बळकट करणे आवश्यक आहे, असे राणे यांनी सांगितले. या क्षेत्राला बळकट करण्यासाठी निश्चितच या दिशेने महत्त्वपूर्ण सामूहिक प्रयत्न झाले आहेत आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नवीन मार्ग खुले करण्याच्या दिशेने सरकारच्या विविध योजना चालना देत आहेत, असे त्यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला वित्तीय संस्थांकडून अखंड पतपुरवठा, विकास आणि आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञान पाठबळ, निर्यातीसाठी बाजारपेठांमध्ये प्रवेश, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी सुविधा आणि या क्षेत्रात कार्यरत मनुष्यबळाचे कल्याण या बाबी सरकारने चांगल्या प्रकारे सुनिश्चित केल्या आहेत, असे ते म्हणाले. दोन दिवसीय परिषदेत विविध विचारमंथन सत्र होणार आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगा क्षेत्रातील सुधारणा, आव्हाने आणि विकासाच्या संधींवर परिसंवाद होणार आहे त्याचप्रमाणे भारत, सिंगापूर, पेरू, लाओ पीडीआर, रवांडा, म्यानमार, रशिया, उझबेकिस्तान, स्पेन आणि इराणमधील वक्ते आणि तज्ञ या परिषदेत उपस्थित आहेत.

Recent Posts

DC vs RCB, IPL 2025: आरसीबीचा दिल्लीवर ६ विकेट राखून विजय, कोहली-कुणालची कमाल

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने…

34 minutes ago

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – जे.पी.नड्डा

छत्रपती संभाजीनगर : जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली…

2 hours ago

कोकण रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांकडून २३ कोटीचा दंड वसूल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली…

3 hours ago

जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…

4 hours ago

पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…

5 hours ago

दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…

6 hours ago