सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकट करणे आवश्यक : नारायण राणे

  65

नवी दिल्ली : देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकासाचे वेगवर्धक असून त्यांना बळकट करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयाय) यांच्या वतीने आयोजित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग स्पर्धात्मकता आणि विकास या विषयावरील दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते . यावेळी त्यांनी देशांतर्गत उत्पादनात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या महत्त्वावर भर दिला. बऱ्याच काळापासून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग किमान संसाधनांमध्ये काम करत आहेत आणि तरीही देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यामुळे हे आपल्या हातात असलेले, विकासाला वेग देणारे उद्योगक्षेत्र बळकट करणे आवश्यक आहे, असे राणे यांनी सांगितले. या क्षेत्राला बळकट करण्यासाठी निश्चितच या दिशेने महत्त्वपूर्ण सामूहिक प्रयत्न झाले आहेत आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नवीन मार्ग खुले करण्याच्या दिशेने सरकारच्या विविध योजना चालना देत आहेत, असे त्यांनी सांगितले.


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला वित्तीय संस्थांकडून अखंड पतपुरवठा, विकास आणि आधुनिकीकरणासाठी तंत्रज्ञान पाठबळ, निर्यातीसाठी बाजारपेठांमध्ये प्रवेश, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी सुविधा आणि या क्षेत्रात कार्यरत मनुष्यबळाचे कल्याण या बाबी सरकारने चांगल्या प्रकारे सुनिश्चित केल्या आहेत, असे ते म्हणाले. दोन दिवसीय परिषदेत विविध विचारमंथन सत्र होणार आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगा क्षेत्रातील सुधारणा, आव्हाने आणि विकासाच्या संधींवर परिसंवाद होणार आहे त्याचप्रमाणे भारत, सिंगापूर, पेरू, लाओ पीडीआर, रवांडा, म्यानमार, रशिया, उझबेकिस्तान, स्पेन आणि इराणमधील वक्ते आणि तज्ञ या परिषदेत उपस्थित आहेत.

Comments
Add Comment

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी