सर्व खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक - वर्षा गायकवाड

  74

मुंबई : राज्य आणि केंद्रीय आदी शिक्षण मंडळाच्या खासगी शाळांमध्ये सीसी टीव्ही बसवण्याचे स्पष्ट निर्देश शुक्रवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिले. येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठीची कार्यवाही शाळांना करावी लागेल, असेही त्यात म्हटले आहे.


प्रत्येक शाळेत यापुढे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद सकाळी आणि शाळा सुटण्यापूर्वी ठेवण्यात येईल. तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे विचारणा करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. राज्यात सध्या खासगी व्यवस्थापनाच्या आणि विविध मंडळाच्या ४० हजार ४३ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्याची कार्यवाही झाली की नाही याची माहितीही शिक्षण विभागाकडून घेतली जाईल. यासाठी सखी-सावित्री समित्यांचे गठण व नियंत्रण याबाबतची जबाबदारी आयुक्तांची (शिक्षण) राहील. तसेच मुलींच्या मार्गदर्शनाची जबाबदारी एका महिला शिक्षकांवर देण्यात येईल.


राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसी टीव्ही बसविण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६५ हजार शाळांंपैकी, सद्यस्थितीत १,६२४ शाळांमध्ये सीसी टीव्ही बसवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. उर्वरित शाळांमध्ये पुढील वर्षभरात सीसी टीव्ही बसवण्यात येणार असून यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी, तसेच सीएसआर फंड किंवा लोकप्रतिनीधींच्या विकास निधीमधून करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या. यासोबत अज्ञात व्यक्तींच्या सूचनांचे, निर्देशांचे पालन करू नये याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल. प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसवण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी