मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागांतून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज, गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली.
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मोठी घोषणा केली. मुंबईतील गोरेगावमध्ये ग्रामीण भागांतून येणाऱ्या आमदारांसाठी ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईत ज्या आमदारांची घरे नाहीत, जे शहरातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्राच्या बाहेरील आहेत, असे आमदार राज्य सरकारच्या या योजनेचे पात्र लाभार्थी असतील, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
अनेक आमदार हे राज्याच्या ग्रामीण भागांतून मुंबईत येत असतात. ते आमदार आहेत. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे महत्वाचे नाही. पण त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची म्हणजे राज्य सरकारची आहे, असेही आव्हाड म्हणाले.
मुंबईतील गोरेगावमध्ये आमदारांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. म्हाडाकडून गोरेगावमध्ये गृहसंकुल उभारण्यात येणार आहे. उच्च उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, असे आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सभागृहात याबाबत माहिती दिली. ३०० आमदारांसाठी राज्य सरकार मुंबईत घरे बांधणार असल्याचे ठाकरे म्हणाले. सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घरे देत आहोत, त्याचाही आनंद आहे, असेही ते म्हणाले.
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…