नवी दिल्ली : देशातील 12 ते 14 वयोगटातील बालके आणि 60 वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरण अभियानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पात्र नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. या लसीकरणाला बुधवारपासून प्रारंभ झालाय. त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी ट्विट करत लसीकरणाचे आवाहन केले आहे.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान म्हणाले की, भारताने देशवासियांच्या लसीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमध्ये हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजपासून, 12-14 वयोगटातील मुले लसीकरणासाठी पात्र आहेत आणि 60 वर्षांवरील नागरीकांनी लसीची खबरदारीची मात्रा घ्यावी. या वयोगटातील नागरिकांना मी लसीकरणाची विनंती करतो. भारताने जागतिक जबाबदारीची भूमिका निभावत लसीकरण मैत्री कार्यक्रमांतर्गत अनेक देशांना लस पाठवली. भारतीय लसींमुळे जागतिक पातळीवर कोविड-19 विरोधात सशक्तपणे लढता आले, याचा मला आनंद आहे. आज, भारताकडे अनेक ‘मेड इन इंडिया’ लसी आहेत. योग्य मुल्यमापन करुन आपण इतर लसींनाही मंजुरी दिली आहे. आम्ही आता या महामारीविरोधात लढण्यासाठी सुस्थितीत आहोत. तसेच आपल्याला कोविड संबंधित खबरदारीच्या उपाययोजनांचे नियमित पालन करत राहावे लागणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…