दिशा सालियान प्रकरणात राणेंना दिलासा

  60

मुंबई : दिशा सालीयान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी काही अटी आणि शर्तींवर राणे पिता पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. यू. बघेले यांनी निर्णय दिला आहे.


दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता. त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. दिशा सालीयान सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर काँट्रोव्हर्सीला सुरुवात झाली. या प्रकरणात राणे पितापुत्रांची मालवणी पोलीस ठाण्यात तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती.


त्यावेळी नारायण राणे यांनी अमित शाहांना फोन लावल्याचा दावा केला. या फोनमुळे त्यांना पोलिसांनी सोडले, असे राणे म्हणाले. त्यानंतर नितेश राणे यांनाही अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना कोर्टाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका