भारतात वाढतोय खाण्याचा मानसिक विकार

Share

अमृता वाडीकर

विविध समस्यांमुळे लोकांचं अन्नाशी असलेलं नातं बदलतं. काही लोक अन्नापासून दूर पळतात, तर काही लोक अन्नाची शिकार होतात. अशा समस्यांना खाण्याचे विकार म्हणतात. हा एक मानसिक विकार आहे.

‘हेल्थलाइन’ वेबसाइटच्या अहवालानुसार, सामान्यतः लोकांमध्ये सहा प्रकारचे खाण्याचे विकार आढळतात. खाण्या-पिण्याचा विकार कोणत्याही वयोगटातील आणि लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो; परंतु तरुणांना याचा सर्वाधिक धोका असतो. याची अनेक कारणं असू शकतात. हेल्थलाइनच्या मते, जुळ्या आणि दत्तक घेतलेल्या लोकांवर केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे की, खाण्याच्या विकारामागे कारण अानुवांशिक असू शकतं. प्रत्येक गोष्ट करण्यामागे उतावळेपणा असण्याच्या त्रासाला ते बळी पडतात. पंथ, संस्कृती आणि मनाची रचना ही खाण्याच्या विकाराची कारणं असू शकतात. एनोरेक्सिया नर्वोसा असलेल्या रुग्णांना लठ्ठपणाची भीती वाटते. हा विकार बहुतेकदा पौगंडावस्थेत विकसित होतो आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त प्रभावित करतो. या विकाराने ग्रस्त असलेले लोक नेहमी स्वत:ला जाड समजतात. ते सडपातळ असले तरीही. एनोरेक्सिया नर्वोसा असलेले रुग्ण वजन वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहतात. त्यांच्यावर लठ्ठ होण्याची भीती स्वार झालेली असते.

असे लोक सतत आपलं वजन तपासतात. त्यांना आपल्या शरीराच्या आकाराची काळजी वाटते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळतो. बुलिमिया नर्व्होसा असलेल्या रुग्णांचा त्यांच्या वजनावर लक्ष ठेवण्याचा आत्मविश्वास कमी होतो. एनोरेक्सियाप्रमाणे, बुलिमिया पौगंडावस्थेमध्ये विकसित होतो आणि स्त्रियांना अधिक प्रभावित करतो. बुलिमिया असलेल्या लोकांना जास्त खाण्याची सवय असते. ते आजारी पडेपर्यंत खात राहतात. अशा लोकांना अन्नावर नियंत्रण ठेवता येत नाही. बुलिमिया नर्व्होसा असलेले रुग्ण उलट्या, उपवास, औषधं घेणं आणि अधिक व्यायाम असे मार्ग अनुसरतात. वजनावर लक्ष ठेवल्याने त्यांचा आत्मविश्वासही कमी आहे.

द्विधा खाण्याच्या विकाराने ग्रस्त असलेले लोक आपल्या आहारावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हा विकार पौगंडावस्थेमध्ये किंवा तारुण्यात विकसित होतो. त्याची लक्षणं बुलिमिया नर्वोसाच्या लक्षणांसारखीच आहेत. यामुळे त्रस्त असलेले लोक कमी कालावधीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या अन्नावर नियंत्रण ठेवता येत नाही. यानंतर, या चुकीसाठी स्वत:ला दोषी मानण्याची लाज वाटते. बिंग इटिंग डिसऑर्डर असलेले आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ते लठ्ठ होतात. त्यांना हृदयविकार, मधुमेह, पक्षाघाताचा धोका जास्त असतो. पिका इटिंग डिसऑर्डरमध्ये लोक माती, खडू, कागद यांसारख्या अन्न मानल्या न जाणाऱ्या गोष्टी खाल्ल्या जातात. बर्फ, धूळ, चिखल, खडू, कागद, साबण, केस, कापड, लोकर, डिटर्जंट आदी बाबी ते खाऊ शकतात. सामान्यपणे मुले, गर्भवती महिला आणि मानसिक आजारांनी ग्रस्त लोक असे पदार्थ खातात. या लोकांमध्ये पौष्टिकतेची कमतरता असते आणि ते काहीही विषारी खाण्याची भीती असते.

नवजात मुलांमध्ये रुमिनेशन डिसऑर्डरचा त्रास वयाच्या तीन ते बारा महिन्यांच्या दरम्यान विकसित होतो. नवजात आणि लहान मुलांमध्ये रुमिनेशन डिसऑर्डर विकसित होतो. हे प्रौढांनाही होऊ शकतं. यामध्ये व्यक्ती खाल्लेलं अन्न पुन्हा पुन्हा चघळते. यानंतर एक तर चघळलेले अन्न गिळते किंवा थुंकते. ही एक गंभीर समस्या आहे, ज्यासाठी थेरपी आवश्यक आहे. नवजात मुलांमध्ये तीन ते बारा महिन्यांच्या वयात हा विकार विकसित होतो. त्यानंतर तो आपोआप बरा होतो. रिस्ट्रिक्टिव फूड इनटेक डिसऑर्डरमुळे त्रस्त झालेली मुलं खाण्यास फारच नाखूष असतात. हा विकार नवजात आणि लहान मुलांमध्ये विकसित होतो आणि प्रौढ होईपर्यंत टिकू शकतो. तो महिला आणि पुरुष दोघांमध्येही होतो. यामध्ये मुलं खाण्यास फार नाखूष असतात. अशा मुलांचं आणि लोकांचं वजन खूपच कमी राहतं. त्यांच्यामध्ये पोषणाचा अभाव असतो. या विकारामुळे मुलांची उंची कमी राहते. त्यांना अन्नाचा वास, चव, रंग, तापमान आणि पोत यांचा त्रास होतो.

बिंग इटिंग डिसऑर्डर असलेले आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ते लठ्ठ होतात. त्यांना हृदयविकार, मधुमेह, पक्षाघाताचा धोका जास्त असतो.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

13 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

45 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago