मुंबईतील मराठी माणूस कारभाऱ्यांना विचारतोय टू बी ऑर नॉट टू बी? - आ. आशिष शेलार

  106

मुंबई : मुंबईतील गिरण्यांचे भोंगे कुणी बंद केले? गिरण्यांच्या जागांसाठी नियमावली कुणी बदलली? गिरणी कामगार कुठे गेला? कोळीवाडे गावठाणांची स्वतंत्र नियमावली कोणी रोखली? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत नटसम्राट नाटकातील आप्पा बेलवलकरांप्रमाणे मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेला विचारतोय टू बी ऑर नॉट टू बी? त्याला शिवसेना सांगतेय "तो मी नव्हेच" अशी टीका भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी वरळी येथे केली.


वरळी कोळीवाड्यात शुक्रवारी भाजपातर्फे मराठी कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील राणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. शेलार म्हणाले की, भाजपाची सत्ता असताना मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन झालं पण सरकार बदललं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गेले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आले, त्यानंतर सिमांकन बंद झालं. एवढंच नाही तर गावठाण आणि कोळीवाडा मध्ये राहणाऱ्यांचे परिवार वाढला मुलं मोठी झाली, मुंबईबाहेर घर घेण्याची ऐपत आहे म्हणून घर वाढवायचे असेल तर परवानगी मिळत नाही, घर दुरुस्ती करता येत नाही. महापालिका अधिकारी लगेच हातोडा घेऊन येतात. दुरुस्ती व देखभाल करायची असेल तर साधा नियम सुद्धा नाही त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय पण सरकार परवानगी देत नाही. दुसरीकडे कोळीवाडे गावठाणांना झोपडपट्टी जाहीर करण्यात आले ही वस्तुस्थिती समजून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. तशीच परिस्थिती मच्छीमार महिलांची आहे. त्यांना मच्छीमार्केट मध्ये लायन्स दिली नाही. त्यासाठी नियम बनवला नाही. वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार कोस्टल रोगमुळे त्यांची मासेमारी कशी धोक्यात आलेय सांगून आंदोलन करीत आहेत पण वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्र्यांना यांना भेटायला वेळ नाही.


मुंबईमध्ये मराठी शाळांची स्थिती गेल्या पंधरा वर्षांमध्ये एक हाती सत्ता एका परिवाराची शिवसेनेची असताना मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी अनुदानित शाळा 221 बंद पडल्या. एस एस सी बोर्डा ऐवजी सीबीएससी बोर्ड आणले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना नाव दिलं मुंबई पब्लिक स्कूल मग तुम्ही मराठीचे कैवारी कसे ? असा सवाल करीत महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली.


शिवसेना हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती त्यावेळी समाजकारण 80 टक्के आणि राजकारण 20 टक्के होतं, आजच्या शिवसेनेचा स्वरूप माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढीच सिमीत आहे असे सांगत त्यांनी मुंबईकरांच्या विषयावर शिवसेनेने कसा अन्याय केला याबाबत सविस्तर उहापोह केला.

Comments
Add Comment

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण

अभिनेत्री आलिया भटला असिस्टंटने लावला ७७ लाखांचा चूना

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश