अलिबागेत मार्च महिन्यातच पाणीटंचाई सुरू

Share

अलिबाग (प्रतिनिधी) : पावसाळा हंगाम सुरू होण्यास अजून तीन महिने उरले असताना अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली आणि मिळकतखार या दोन गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दोन्ही गावांना जिल्हा परिषदतर्फे टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. रांजणखार डावली आणि मिळकतखार गावाला जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. मात्र तोपर्यंत तरी महिलांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असताना अनेक भागांत डिसेंबरपासूनच पाण्याची समस्या नागरिकांना जाणवू लागते. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जलजीवन, ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यन्वित केल्या आहेत. तरीही पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागत आहे. अलिबाग तालुक्यातही रेवस विभाग हा नेहमीच तहानलेला असतो. जानेवारी महिन्यापासूनच या विभागात पाणी टंचाई समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते.

तालुक्यातील रांजणखार डावली आणि मिळकतखार भागही नेहमीच तहानलेला असतो. पाण्यासाठी येथील महिलांना वणवण करावी लागते. अनेकदा विकतचे पाणी घ्यावे लागत असते. फेब्रुवारी महिन्यापासूनच या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही गावांसाठी नव्याने पाणी योजना कार्यन्वित केली जात आहे. मात्र, तिचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

रोज एक टँकरच पाणी

पाणीटंचाई असल्याने रोज पाण्याचा एक टँकर या गावांना दिला जात आहे. त्यामुळे या टँकरच्या पाण्यावर येथील नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, या गावांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे प्रशासनाकडे केली जात आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

59 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago