मिर्जापूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम भागाच्या मतदानादिनी केंद्रीय मंत्री आणि अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया सिंह पटेल यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी – भाजपच्या विजयावर विश्वास व्यक्त करीत सूचक विधान केले.
सोमवारी मिर्जापूर येथे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अनुप्रिया सिंह पटेल म्हणाल्या, “मी माझे मतदान पूर्ण केले. मला विश्वास आहे की, युतीचे सर्व ५ उमेदवार विजयी होणार. लोकशाहीच्या महापर्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय निश्चित आहे. विकास लक्षात घेता मिर्जापूर येथे अनेक परियोजना साकार होताना मी बघितले आहे. “वाराणसी समेत एकूण ५४ विधानसभा जागांसाठी सोमवारी मतदान आयोजित करण्यात आले. यात ६१३ उमेदवार असून ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. मतमोजणी १० मार्च रोजी आहे.