उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही केले तर अजित पवारांना फासावर लटकवणार का?

  71

मुंबई : भाजप आमदार रवी राणा यांचा संबंध नसतानाही राज्य सरकारने त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेकीचा घटना घडली तेव्हा रवी राणा दिल्लीत होते. तरीही पोलिसांनी रवी राणा यांच्यावर कलम ३०७ आणि कलम ३५३ सारख्या कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे समर्थन अजिबात होणार नाही, ही घटना अत्यंत चूक आहे. पण गु्न्हेगाराशी संबंध नसताना शिक्षा दिली जात आहे. उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही केले तर मग अजितदादांना फासावर देणार का, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना उपस्थित केला.


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली. रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना कोणत्या नेत्यांचे फोन गेले? रवी राणा यांच्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. तर शाईफेक करणाऱ्यांवर तितके गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ३०७ चा गैरवापर सुरु आहे. अशाने पोलीस बेछूट होतील. आम्हाला गोंधळ करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. काही तरी आश्वासन द्या. विधानसभा सदस्यावर अन्याय झाला, काही तरी आश्वासन मिळायला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Comments
Add Comment

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा