कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करा

Share

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या हायकोर्टाने काल गुरुवारी भारताला कुलभूषण जाधव यांच्यासाठी १३ एप्रिलपर्यंत वकील नियुक्त करण्यासाठी सांगितले आहे. यानंतर पाकिस्तानकडून जाधव यांना दिली गेलेली मृत्यूच्या शिक्षेवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात येईल. भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सैन्याच्या कोर्टाने मृत्यूची शिक्षा सुनावली होती.

भारताने या शिक्षेला आव्हान देण्यासाठी पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर हेगमधील कोर्टाने जुलै २०१९ मध्ये असा निर्णय दिला होता की, पाकिस्तानने जाधव यांना भारताच्या काऊन्सिलरसाठी परवानगी द्यावी आणि त्यांना दिलेल्या या मृत्यूच्या शिक्षेवर पुनर्विचार करावा.

इस्लामाबाद हायकोर्टाने ऑगस्ट २०२० मध्ये मुख्य न्यायाधीश अतहर मिनल्लाह, न्यायमूर्ती अमीर फारुक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांच्या तीन सदस्यीय पीठाची नियुक्ती केली होती. त्यांनी वारंवार भारताला जाधव यांच्यासाठी पाकिस्तानमधून एक वकिल नियुक्त करण्यास सांगितले होते. मात्र, भारताने वारंवार भारतीय वकीलांची नियुक्ती करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानचे अटॉर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी भारतीय पक्षाची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने गुरुवारी भारताला जाधव यांच्यासाठी १३ एप्रिलपर्यंत वकील नियुक्त करण्यास सांगितले आहे. तसेच खान यांनी कोर्टाला म्हटले होते की, भारत जाणीवपूर्वक या प्रकरणी उशीर करत आहे. जेणेकरुन त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये धाव घेता येईल आणि पाकिस्तानविरोधात तक्रार करण्याची खोड काढता येईल.

Recent Posts

१००, २०० रूपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा बऱ्याचदा एटीएममधून ५००च्याच नोटा येतात. मात्र…

15 minutes ago

११ षटकार,७ चौकार आणि ३५ बॉलमध्ये शतक, १४ वर्षाच्या या पोराने आयपीएलमध्ये रचला इतिहास

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात १४…

47 minutes ago

मिठी नदी : एसआयटीने पालिकेकडे मागितली कंत्राटदारांची माहिती

कामांसाठी नेमलेल्या कंपन्यांची होणार चौकशी मुंबई (प्रतिनिधी): मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये अनियमिता दिसून आल्याने…

1 hour ago

Health: अशा लोकांनी चुकूनही आईस्क्रीम खाऊ नये

मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…

2 hours ago

राणीबागेत तब्बल ७० कोटी रुपये खर्च करून उभारणार मत्स्यालय

मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…

2 hours ago

सरकारी अनास्थेमुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; मोखाड्यात पुन्हा बालमृत्यू, मातामृत्यूचे वाढते प्रमाण

मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…

7 hours ago