राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधा-यांचा गोंधळ; 'राज्यपाल हटाव'च्या घोषणा

  68

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असताना सुरुवातीला राज्यपाल आपले अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होते. मात्र, राज्यपालांच्या या भाषणावेळीच सत्ताधा-यांकडूनच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले आणि ते निघून गेले. विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे.


त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग 'नवाब मलिक हाय हाय'च्या घोषणा दिल्या.


विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळले. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळात आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधा-यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' अशा घोषणाही देण्यात आल्या.


या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे की, शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. अशा पद्धतीची भूमिका घेऊन तसा कायदेशीर प्रस्तावही आणला जाणार आहे. या प्रकारे छत्रपतींचा अपमान आणि फुले दांपत्याबाबतचे आक्षेपार्ह वर्तन राज्यपालांना शोभेसे नाहीये. त्याबाबत भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट करावी.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र