एकही सामना न खेळता ऋतुराज श्रीलंका मालिकेबाहेर

  67

धरमशाला (वृत्तसंस्था) : भारताचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे श्रीलंकेविरूद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे.


या झटपट मालिकेतील अंतिम संघा ऋतुराजचा समावेश नक्की होता. मात्र, मनगटाच्या दुखापत झाल्याने तो सलामीला खेळू शकला नाही. दुखापत गंभीर असल्याने तो उर्वरित मालिकेत खेळू शकणार नसल्याचे संघ बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.


उजव्या मनगटात वेदना होत असल्याचे ऋतुराजने लखनऊ येथील पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्याआधीच सांगितलं होतं. त्यावेळी बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्याच्या मनगटाचा एमआरआय स्कॅनही काढण्यात आला. स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून त्याच्याबाबत सल्ला घेण्यात आल्यावर तो टी-ट्वेन्टी मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. या दुखापतीनंतर आता ऋतुराज काही दिवसांसाठी बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होणार आहे. त्याच्या दुखापतीवर पुढील उपचार तेथेच केले जाणार असून त्या दृष्टीने त्याचे तिथेच काही दिवस वास्तव्य असेल.


ऋतुराज गायकवाडच्या जागी भारतीय संघाच्या निवड समितीने मयंक अग्रवाल याचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मयंकचा समावेश आहे. त्यामुळे तो टीम इंडियाच्या बायो-बबलमध्येच होता. ऋतुराज उपलब्ध असल्याने मयंक हा धरमशाला येथे जाऊन भारताच्या टी-ट्वेन्टी संघात दाखल झाला.


भारताने विजयी सलामीसह श्रीलंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


पाहुण्यांचे दोन क्रिकेटपटूही दुखापतग्रस्त


भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघाला मोठा दुहेरी धक्का बसला. फिरकी गोलंदाज महिष तिक्ष्णा आणि वेगवान गोलंदाज शिरन फर्नांडो हे दोन स्टार खेळाडू दुखापतींमुळे उर्वरित दोन्ही टी-ट्वेन्टी सामन्यांना मुकले आहेत. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा याआधीच मालिकेबाहेर झाला होता. त्याबरोबरच फलंदाज कुशल मेंडिस याचाही सामन्यातील सहभाग संशयास्पद आहे. तिक्ष्णा आणि मेंडिस हे सध्याच्या श्रीलंकेच्या संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जातात. शिरन फर्नांडोनेही अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन