रशिया आणि युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार कोसळले

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटल्याने आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. या पडझडीत सेन्सेक्स २००० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ५८० अंकांनी कोसळला. या घसरणीत जवळपास पाच लाख कोटींचे नुकसान झाले आहे.


बाजार सुरु होताच सर्वच क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला. बँका, ऑटो, पीएसयू यामध्ये प्रचंड विक्री झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम याची चिंता गुंतवणूकदारांना लागली आहे.


सेन्सेक्स मंचावरील सर्वच्या सर्व ३० शेअरमध्ये मोठी घसरण झाली. एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस, या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी मंचावरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात २ ते ३ टक्के इतकी प्रचंड घसरण झाली. यात बँकांच्या शेअरला मोठा फटका बसला. अदानी पॉवर, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, टाटा मोटर्स, येस बँक, धनी सर्व्हिसेस, सेल या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.


सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८०९ अंकाच्या घसरणीसह ५५४२२ अंकावर आहे. निफ्टी ५०५ अंकांनी कोसळला असून तो १६५५८ अंकावर ट्रेड करत आहे. या पडझडीने गुंतवणूकदार मात्र चांगलेच होरपळून निघाले आहेत.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकरांकडून प्रशासनावर संतप्त सवाल!

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या