Share

कणकवली (प्रतिनिधी) : सुडाचे राजकारण यांनी सुरू केले असले तरी शेवट मीच करणार. मी पुरा ९६… आहे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे पुढे बोलताना म्हणाले, माझा बंगला तोडायची कोणाची हिंमत नाही. सर्व अटींची पूर्तता करून मालवणचा नीलरत्न बंगला बांधला. त्यात अनधिकृत काही नाही. अधिकृत असल्यामुळेच आम्हाला त्यावेळी भोगवटादार पत्र मिळाले. दुसरी गोष्ट मालवणच्या बंगल्याला कोणतीही नोटीस नाही. मुंबई आणि मालवण येथे कसलेही अनधिकृत बांधकाम नाही. मात्र खोट्या बातम्या देऊन नाहक बदनामी केली जात आहे. अशी बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस दिली जाणार असल्याचे यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

कोणतीही बातमी दुसऱ्याच्या दुःखात भर टाकण्यासाठी असू नये. कोकण आणि मालवणी लोक तक्रारींचे समर्थन करायला असतात, मात्र चांगले काम केले तर अभिनंदन करायला कोण आले नाहीत, असे नारायण राणे म्हणाले. मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, हे होणारच होते, मलिक यांचे आजचे संबंध नाहीत. अनेक वर्षांचे संबंध आहेत. अजून अनेकांचे नंबर लागतील. हळूहळू सर्व कळेल. नवाब मालिकांचे अनुकरण कोणी करू नये. आता बोल म्हणावे ईडी समोर, नाही तर तोंडात विडी देणार हे ईडीवाले. अशी मिश्कील टीकाही यावेळी नारायण राणे यांनी केली.

खासदार संजय राऊत बेजबाबदार बोलणार आणि आम्ही त्याला उत्तरे का द्यावीत. त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. दिशा सालियन संदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले, दिशाला ज्याने मारले त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आम्ही बोलतोय. दिशाच्या नातेवाइकांची यापूर्वी काय भूमिका होती, हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे योग्य न्यायासाठी आम्ही बोलत आहोत, असे ते म्हणाले.

Recent Posts

DC vs RCB, IPL 2025: आरसीबीचा दिल्लीवर ६ विकेट राखून विजय, कोहली-कुणालची कमाल

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने…

11 minutes ago

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – जे.पी.नड्डा

छत्रपती संभाजीनगर : जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली…

2 hours ago

कोकण रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांकडून २३ कोटीचा दंड वसूल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली…

3 hours ago

जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…

4 hours ago

पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…

4 hours ago

दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…

6 hours ago