मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याने या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी संजय राठोड आणि अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानीही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता या दोन बैठकांमध्ये काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…