ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या प्रकरणांचा पाढा चंद्रकांत पाटलांनी वाचला

मुंबई : मुख्यमंत्री आता कशाची वाट पाहताहेत? तुमचा एक मंत्री मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गेला, तुमचा गृहमंत्री जेलमध्ये आहे, मुंबईचे पोलिस कमिश्नर अचानक गायब होतात, त्यांच्यावरही केसेस आहेत. तुमचा एक पोलिस अधिकारी सचिन वाझे जेलमध्ये आहे, तुमचे एक मंत्री ईडीसमोर हजर राहत नाहीत, म्हणून त्यांना सक्तीने हजर करावे लागते. आज अल्पसंख्याक मंत्र्यांना अटक झाली. तुमच्या परिवहन मंत्र्यांचे रिसॉर्ट तोडण्याची केंद्रातून ऑर्डर निघाली तर दुसऱ्या एकाने भीतीपोटी स्वतःच बंगला तोडला,' अशाप्रकारे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या प्रकरणांचा पाढाच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वाचला.


राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मलिकांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'अशाप्रकारचे आरोप झाल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करतो की, त्यांनी मलिक यांची तात्काळ हकालपट्टी करावी. मलिकांची हकालपट्टी केली नाही', तर भाजप आंदोलन करेल.


ते पुढे म्हणाले की, 'तुमच्या लोकांनी कोविड महामारीत घोटाळे केले, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावे असलेले १९ बंगले गायब झाले. तुमच्या एका मंत्र्यांच्या दोन बायका आहेत, जे कायद्यात बसत नाही, ही यादी वाचताना मला दम लागला. मी एक नोट तयार केली आहे, ज्यामध्ये या सरकारमधील मंत्र्यांनी काय-काय केले त्याची यादी आहे. ही यादी तयार करताना २२ पाने भरली. ही अशी सगळी प्रकरणे असूनही सरकार काहीच करत नाहीत', अशी टीका पाटील यांनी केली.

Comments
Add Comment

उन्नती, प्रगती, विकासासाठी मुंबईवर महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे!

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन मुंबई (खास प्रतिनिधी) :

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

दादरच्या 'स्टार मॉल'मध्ये भयंकर आग!

सेनाभवनसमोर असलेल्या मॉलमध्ये मॅकडोनाल्ड्सच्या किचनमध्ये आग! मुंबई : दादर पश्चिम येथील गजबजलेल्या स्टार

मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत

मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या