निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस! एकाच निवडणुकीत तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा आणली असली तरीही राजकीय पक्ष प्रचारामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात. सेंटर फॉर मीडिया स्टडीजने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३० हजार कोटी रुपये खर्च झाले होते.


विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एकट्या भाजपाने ३ हजार ५८५ कोटी रुपये खर्च केले. तर काँग्रेसने १४०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. हा आकडा २०१५-१६ पासून २०१९-२० पर्यंतचा आहे. ही माहिती राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.


दरम्यान, यावेळी एकट्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये चार हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. हा पैसा मागच्या दरवाजाने येत असतो. त्यामुळेच निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम पकडली जात आहे.


याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात २० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमधून १९१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशात ११५ कोटी रुपयांची रोकड सापडली होती.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव