शिवसेना उपनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

  42

पुणे : लग्नाच्या भूलथापा देऊन एका २४ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेना उपनेता, कामगार सेनेचा सरचिटणीस आणि राज्याच्या किमान वेतन समितीचा अध्यक्ष रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.


आपल्या तक्रारीत पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ या काळात आपल्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.


गर्भपात केल्याचे तसेच आपल्या संबंधांबाबत कुणालाही सांगितले तर तुला जीवे मारेल अशी धमकी देण्यात आल्याचेही पीडित तरुणीने म्हटले आहे.


गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवण्यात येत होते. लग्नाचे आमिष दाखवत आपल्यावर पुणे, गोव्यातील विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले, असेही पीडित तरुणीने म्हटले आहे. या संदर्भात अद्याप शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.


या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आयपीसी ३७६, ३१३, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, एका ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी