अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार

  101

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नागपुरात घ्यावे यासाठी राज्यपाल यांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही. तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे नागपुरात अधिवेशन घेता येणार नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांनी ९ फेब्रुवारीला सांगितले होते.


करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. वर्षातून किमान तीन अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. साधारणतः तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. बोटावर मोजण्याइतके पावसाळी अधिवेशनही नागपूरला झाले आहेत. परंतु, कोरोनाच्या कारणामुळे दोन वर्षांत एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


याआधी, २८ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे पत्रक निघाले होते. मात्र ९ फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी विधिमंडळ सचिवालय यांनी जी माहिती पुढे ठेवली त्यानुसार नागपूरमध्ये अधिवेशन घेतल्यास राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृह नाही, आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. अशात आजच्या घडीला अधिवेशन नागपूरला घेणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे. या शिफारशीनुसार १५ फेब्रुवारीला होणाऱ्या समितीच्या बैठकीत अधिवेशन मुंबईत घेण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. आज झालेल्या बैठकीत अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी