लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी

  82

रांची : आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांना चारा घोटाळा प्रकरणातील एका केसमध्ये रांचीच्या सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले आहे.


डोरंडा ट्रेजरीमधून अवैधरित्या पैसे काढल्याचे प्रकरण हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठे प्रकरण म्हणून ओळखले जाते. या प्रकरणात रांचीच्या सीबीआय कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डोरंडा ट्रेजरीमधून 139.35 कोटी रूपये अवैधरित्या काढण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पहिल्यांदा 170 आरोपी निश्चित करण्यात आले होते. यातील 55 आरोपींचा मृत्यू झाला आहे.


तर दिपेश चांडक आणि आरके दास यांच्यासह सात आरोपींना सीबीआयने आपला साक्षीदार बनवले आहे. सुशील झा आणि पीके जैसवाल यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच आपला दोष मान्य केला होता. या प्रकरणातील 6 आरोपी फरार झाले आहेत. या हाय प्रोफाईल प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या व्यतिरिक्त माजी खासदार जगदीश शर्मा, डॉक्टर आर के राणा, ध्रुव भगत, तत्कालीन पशुपालन सचिव बेक ज्यूलियस, पशुपालन विभागाचे सहाय्यक निदेशक डॉ. केएम प्रसाद यांच्यासहीत 99 आरोपींच्या विरूद्ध आज निकाल लागणार आहे. सीबीआय कोर्ट याबाबतचा निकाल 18 फेब्रुवारीला सुनावणार आहे.


डोरंडा ट्रेजरीमधून अवैधरित्या पैसे काढल्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्या व्यतिरिक्त आरके राणा, दगदीश शर्मा, ध्रुव भगत यांना देखील रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवले आहे. तर बाकीच्या 24 आरोपींना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले आहे. तर 36 आरोपींना दोषी ठरवून त्यांना 3 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र लालू प्रसाद यादव यांना किती शिक्षा द्यायची याबाबतचा निकाल अजून झालेला नाही. तो निकाल 18 फेब्रुवारीला देण्यात येईल.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये