आपले भारतरत्न - लता मंगेशकर

‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशाची कीर्ती वाढवणा-या व्यक्तीला भारत सरकारकडून या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.


गानसम्राज्ञी लता मंगेशकर या भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय गायिका आहेत. सिनेसंगीतात केलेल्या अजोड कामगिरीबद्दल त्यांना ‘गानकोकिळा’ हा किताब दिला गेला आहे. ‘लतादीदी’ नावानेही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात इ. स. १९४२ मध्ये झाली.


त्यांनी वीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये ९८० पेक्षा अधिक चित्रपटगीतं गायली आहेत. १९७४ ते १९९१ या काळात सर्वात अधिक गाणी गाण्याचा त्यांच्या विक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात शीख मोहल्ल्यात झाला. आपले वडील


पं. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकात बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. २००१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला.


Comments
Add Comment

साबणाचे फुगे कसे निर्माण होतात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर सीता व नीता या दोन्हीही बहिणी खूपच उत्साहाने घरी

कावळा निघाला शाळेला...

कथा : रमेश तांबे एक होता कावळा. त्याला एकदा वाटलं आपणही शाळेत जावं. माणसांची मुलं शाळेत जातात. तिथं जाऊन मुलं काय

ट्रोल

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ साधारण दहा वर्षं मागे पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की ‘ट्रोल’ हा शब्द मी अलीकडे

निंदा वाईटच

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्य सामाजिक प्राणी आहे. समाजात राहण्यासाठी परस्परांचा आदर, समजूत,

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची. तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील रोजच्यासारखे सीता व नीता या दोघी बहिणींनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपला गृहपाठ