नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील तपोवन कॉर्नर येथे ही घटना घडली.
नाशिक-औरंगाबाद शिवशाही बस ही तपोवन कॉर्नर येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलाखालील ४४ नंबरच्या खांबावर ही बस आदळली. तसंच एका दुचाकीलाही धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.