पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे निर्व्यसनी, बंडातात्यांनी मागितली माफी

सातारा : पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या दारु पितात, असे वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. मात्र, आता बंडातात्यांनी जाहीर माफी मागितली आहे.


मीडियासमोर येऊन बंडातात्यांनी आपले विधान मागे घेतले आणि पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागितली. तसेच, पंकजा मुंडे आणि सुप्रियाताई या निर्व्यसनी, सदाचारी आहेत, असे बंडातात्या म्हणाले. सुप्रियाताई आणि पंकजाताई यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नाही. काही ऐकीव माहितीच्या आधारे मी ते विधान केले. माझ्या मनात त्यांच्याविरोधात काहीच मत नाही. त्या दोघींना भेटून दिलगीरी व्यक्त करणार आहे, असे बंडातात्या म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, सुप्रिया आणि पंकजा यांना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागतो. माफी मागण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. मी त्यांना विनंती करेल की तुमच्या अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच, राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलंच आहे, असंही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष