
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला तोडफोडीचे गालबोट लागले असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, धारावीत दहावी, बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांचा जमाव कसा झाला? त्यांना नेमकं कुणी बोलावलं होतं? याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आले असता अनेकांनी 'हिंदुस्थानी भाऊ'चे नाव घेतले.
राज्यात केवळ धारावीतच नव्हे, तर नागपूर, सातारा, कराड इतर काही ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन केले. त्यामुळे हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ धारावीत आंदोलनात सामील झाला होता आणि त्यानेच केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.