भविष्यातही कोरोनापेक्षा भयंकर महामारी येऊ शकते

बिल गेट्स यांच्याकडून धोक्याचा इशारा


वॉशिंग्टन : संपूर्ण जग गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी संकटाचा सामना करत आहे. कोरोना महामारीचा समूळ नायनाट होत नसल्याने जगाची चिंता वाढली आहे. त्यात आता कोरोनाचे नवे व्हेरिएंट डोकेदुखी वाढवत आहेत. आतापर्यंत ३५ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसागणिक हा आकडा वाढतच आहे. त्यात आता उद्योगपती बिल गेट्स यांनी भविष्यातही कोरोनापेक्षा भयंकर महामारी येऊ शकते, असा धोका जगाला सांगितला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.


भविष्यात कोरोनापेक्षा भीषण महामारी येऊ शकते, असा धोक्याचा इशारा गेट्स यांनी दिला. बिल आणि मेलानिया गेट्स फाऊंडेशनने कोएलिशन फॉर एपेडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशनला (सीईपीआय) १५० मिलियन डॉलरची रक्कम दान केली. यावेळी त्यांनी भविष्यातील रोगांबद्दल चिंता व्यक्त केली. जग वेगाने विकसित होत असलेल्या विषाणूंशी मुकाबला करत असल्याचे गेट्स म्हणाले.


संशोधन आणि विकास यांच्यावर केली जाणारी गुंतवणूक आपले आयुष्य वाचवू शकते हे आपण गेल्या २० वर्षांत पाहिले आहे. यामुळे आपण सर्वात कठीण काळ टाळू शकतो. भविष्यात येणारी रोगराई, महामारी पाहता सरकारांनी एकमेकांना सहकार्य करायला हवे. काही संभाव्य महामारीत मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा अधिक असू शकते, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.

Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात