कल्याण : उत्तर प्रदेशात भाजपमधून जे नेते चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल असे अजिबात नाही, उलट जे भाजप सोडून जात आहेत त्यांचेच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप ३०० जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी किती प्रचार केला तरी भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, असा टोला केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांना लगावला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे कल्याणनजीक गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेसाठी आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे, कॉलेज संचालक रवींद्र घोडविंदे आणि रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी अखिलेश यादव यांना टोला लागावला. तसेच अन्य राजकीय मुद्यावर मत मांडले.
मते खाण्याच्या राजकारणापेक्षा मते घेऊन निवडून येण्याचे राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा, असा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी असा सल्ला दिला.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…