नवी मुंबईतील दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्राच्या कालावधीत वाढ

  130

नवी मुंबई (प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र प्रणालीद्वारे विहित वेळेत मिळण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती; परंतु दिव्यांग व्यक्तींचा ओळखपत्राला वाढता प्रतिसाद पाहून अजून सात दिवस वाढविले असल्याची माहिती अपंग शिक्षण प्रशिक्षण सेवा सुविधा केंद्राच्या मनपा संचालिका डॉ. वर्षा भगत यांनी दिली.



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी वैश्विक ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. यामागे दिव्यांग योजना घेताना या ओळखपत्राचा वापर सहजरित्या करता येईल, हा त्यामागे उद्देश होता. त्या शासन निर्णयाला अनुसरून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशाने १० ते १४ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ नवी मुंबई क्षेत्रात वास्तव्य करणारी दिव्यांग मुले व व्यक्तींना त्यांचे वैश्विक ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या ईटीसी उपकेंद्र ऐरोली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते; परंतु नियोजित वेळ अपुरी व वाढता प्रतिसाद पाहता वेळेत बदल करून आता २१ जानेवारीपर्यंत कालावधी वाढविण्यात आला आहे.



प्रत्येक दिवशी मर्यादित जागा असल्या कारणाने विविध संस्थेमध्ये शिक्षण व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. मनपा क्षेत्रातील वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींचे वैश्विक ओळखपत्र संगणकीय नोंदणी करण्यासाठी व ओळखपत्र मिळण्यासाठी समाजसेवक राजेंद्र नवघरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ईटीसीकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता