ठाण्यात खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयावरून सेना-राष्ट्रवादीत लढाई

ठाणे (वार्ताहर) : कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयावरून सेना-राष्ट्रवादीत बाचाबाची झाली. कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शनिवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी सेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.

यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. मात्र, काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपण सगळे एकच आहोत, असे सांगत दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र, या घटनेमुळे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.

खारेगाव उड्डाणपुलासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा शिवसैनिकांनी केला.
कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लागले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत बॅनर्स आणि झेंडे लावायला सुरुवात केली. दरम्यान यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक उमेश पाटील घटनास्थळी आले. तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, काहीवेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.
खारेगाव उड्डाणपुलाचे काम बराच काळ रखडले होते. मफतलाल कंपनीची जमीन मिळत नसल्यामुळे उड्डाणपुलाचे काम सातत्याने लांबणीवर पडत होते.
Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना