Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयावरून सेना-राष्ट्रवादीत लढाई

ठाण्यात खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयावरून सेना-राष्ट्रवादीत लढाई

ठाणे (वार्ताहर) : कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयावरून सेना-राष्ट्रवादीत बाचाबाची झाली. कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शनिवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी सेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.

यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. मात्र, काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपण सगळे एकच आहोत, असे सांगत दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र, या घटनेमुळे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.

खारेगाव उड्डाणपुलासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा शिवसैनिकांनी केला.
कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लागले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत बॅनर्स आणि झेंडे लावायला सुरुवात केली. दरम्यान यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक उमेश पाटील घटनास्थळी आले. तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, काहीवेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.
खारेगाव उड्डाणपुलाचे काम बराच काळ रखडले होते. मफतलाल कंपनीची जमीन मिळत नसल्यामुळे उड्डाणपुलाचे काम सातत्याने लांबणीवर पडत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -