वीटभट्टीमुळे अनेक कुटुंबांना मिळत आहे रोजगार

  105

पारस सहाणे


जव्हार :जव्हार तालुका हा अतिदुर्गम आणि डोंगर-दऱ्यांचा भाग आहे. येथे प्रचंड पाऊस पडतो, परंतु पाणी साठवणुकीसाठी व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवतेच, शिवाय आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याबाबतीत तालुकावासीय खूप मागे आहेत. सध्या स्थानिक आदिवासी कुटुंबांना वीटभट्टीवर रोजगार उपलब्ध झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे.

तालुक्यात आजही भूमीहीन ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. काही शेतकरी पारंपरिक शेतीवर आपला चरितार्थ चालवत आहेत. तथापि, पारंपरिक शेती असल्याने ज्यांच्याकडे शेतजमीन आहे त्यांचे उत्पन्न हे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उरलेले ८ महिने आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतरित होण्याशिवाय पर्याय नाही. तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायत व दोन ग्राममंडळ आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत भागात वीटभट्टी सुरू असल्याचे चित्र देखील आहे. गावातील अनेक कुटुंबांना वीटभट्टीवर काम मिळाल्याने गावातच रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

प्रत्येक कुटुंबाला पक्के घर आणि प्रत्येक घरी वीज व पाण्याची मूलभूत सोय उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून दारिद्र्य रेषखालील प्रत्येक गरजू आदिवासी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासनाच्या इतर योजनेतून घरकुल देण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाकडे पक्के घर असणार आहे. घर म्हटले की, महत्त्वाचा घटक म्हणजे विटा आहेत आणि विटांची गरज प्रत्येक बांधकामाला लागणार असल्याने बेटांची मागणी वाढतच राहणार आहे.

अनेक कुटुंबांनी विटनिर्मिती करून आपल्या घराचे बांधकाम करण्यास पुढाकार घेऊन करून बचत करण्याचा मार्ग सुद्धा शोधला आहे. एखाद्या कुटुंबाला ८ हजार विटांची गरज असेल तर तो एकूण बारा ते पंधरा हजार विटांची भट्टी तयार करतो त्यातून उरलेल्या विटांची विक्री करून घरासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करतो.

तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय सुरू झाल्याने कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. काही कुटुंबांनी तर स्वतः वीटभट्टी तयार करून त्यातून रोजगार उपलब्ध केला. शिवाय, स्वतःला आवश्यक नसलेल्या विटा विकल्या.
- सोनू खुताडे, वीटभट्टी व्यावसायिक

पंचायत समितीकडून घरकुल मिळाल्यानंतर विटांचा भाव काढल्यानंतर सहा रुपये प्रति नग आहे. मात्र, विटांचा खर्च जास्त वाढल्याने स्वतः वीटभट्टी तयार करून बाकी विटा विकल्या आणि त्या पैशातून दोन खोल्यांचे घर बांधले.
- राजाराम कोरडा, रहिवासी नांगरमोडा
Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता