Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीअंबा नदीत चक्क मेलेल्या कोंबड्या आणि मासळी

अंबा नदीत चक्क मेलेल्या कोंबड्या आणि मासळी

गौसखान पठाण

सुधागड-पाली : पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे अंबा नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही मासळीवाले व चिकन व्यावसायिक न विकला गेलेला माल आणि सडलेली मासळी आणि मेलेल्या कोंबड्या रात्री नदीत फेकून देतात. सध्या नदीचे पाणी वाहते नाही. बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. परिणामी या मेलेल्या कोंबड्या व मासळी नदीपात्रात तिथेच पडून राहते व ते सडल्यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पालीकरांना पुरविले जाते. परिणामी रोगराई पसरण्याचा धोका देखील आहे.

नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली पाहिजे. जे कोणी असा प्रकार करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
– मंगेश यादव, जिल्हा अध्यक्ष, लोककल्याण
ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -