ऋषभ पंतचं धडाकेबाज शतक

केपटाऊन (वृत्तसंस्था): यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला (नाबाद १००) मोक्याच्या क्षणी सूर गवसला. त्याच्या ‘मास्टर स्ट्रोक’च्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात १९८ धावांची मजल मारताना तिसरी आणि अंतिम कसोटी जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले.

पंतने चौथे कसोटी शतक झळकावताना भारताला दोनशेच्या घरात नेले. त्याच्या १३९ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. पंतने कोहलीसह पाचव्या विकेटसाठी ५१ धावा जोडताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारताच्या डावातील ही दुसरी भागीदारी ठरली. कोहलीने चेतेश्वर पुजारासह तिसऱ्या विकेटसाठी केलेली ६२ धावांची पार्टनरशीप डावातील सर्वाधिक ठरली.

२ बाद ५७ धावांवरून पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी गुरुवारी पाहुण्यांनी उर्वरित ८ विकेटच्या बदल्यात १४१ धावांची भर घातली. त्यातील १०० धावा पंतच्या आहेत. कर्णधार कोहलीने त्याच्यानंतर सर्वाधिक धावा केल्यात. त्याने संयमी खेळ करताना १४३ चेंडूंत २९ धावा काढल्या. पंत आणि विराटच्या मिळून १२९ धावा पाहता भारताच्या उर्वरित आठ फलंदाजांनी केवळ ४१ धावांची भर घातली आहे. त्यात २८ धावा अंवातर रूपातील आहेत.

पंतने लाज राखली तरी मयांक अगरवाल (७ धावा), वनडाऊन चेतेश्वर पुजारा(९ धावा), अजिंक्य रहाणे (१ धाव) या भरवशाच्या फलंदाजांना केवळ खाते उघडता आले. उपकर्णधार लोकेश राहुलने १० धावा केल्या. कर्णधार कोहलीनंतर त्याच्या धावा सर्वाधिक आहेत. मात्र, भारताला दोनशेच्या घरात पोहोचवण्यात अवांतर धावांचा मोठा वाटा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी अचूक मारा केला तरी २८ एक्स्ट्रॉ धावा दिल्या. त्यात ९ नोबॉल, २ वाइड, ९ लेगबाइज आणि ८ बाइज धावांचा समावेश आहे. यजमानांकडून मार्को जॅन्सेन सर्वात यशस्वी ठरला. त्याने ३६ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याला कॅगिसो रबाडा आणि लुन्गी एन्गिडीची (प्रत्येकी ३ विकेट) चांगली साथ लाभली.

अनेक विक्रमांना गवसणी


ऋषभने नाबाद शतकी खेळी करताना अनेक विक्रम नोंदवले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे कसोटीत ५० हून धावा करणारा तो भारताचा तिसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. किरण मोरे आणि महेंद्रसिंग धोनी यांनाच हा विक्रम करता आला आहे.
परदेशातील कसोटीतील ५० हून धावा करण्याची त्याची ही सहावी वेळ आहे. सय्यद किरमानी ( ५) यांचा विक्रम मोडला.यात धोनी ( १९), फारूख इंजिनियर ( ८) व किरण मोरे ( ८) हे आता आघाडीवर आहेत.
Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर