Share

आनंद भाटे , प्रख्यात गायक

लहानपणापासून रामदासजींची गाणी कानावर पडली होती. त्यामुळे त्या कोवळ्या वयामध्ये ‘नाट्यक्षेत्रातलं एक मोठं नाव’ अशी त्यांची छबी मनावर बिंबली होती.कोणालाही आपलीशी वाटावी आणि पटकन आवडावी अशी त्यांची गायकी होती. त्यांची शब्द उच्चारण्याची, ताना घेण्याची पद्धत या सगळ्यांतच सहजता होती. रामदासजींचा स्वभावही अत्यंत पारदर्शी होता. कलाकाराबरोबरच माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. स्वभावातला प्रामाणिकपणा त्यांच्या गाण्यात स्पष्ट दिसायचा. त्यांच्या गाण्यात कधीही मुद्दाम केलेले गिमिक्स दिसले नाहीत. अतिशय छान आणि सुस्पष्ट मांडणी हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खरं तर, त्यांची गायकी इतकी छान होती की, कधी गिमिक्स करण्याची गरजच भासली नाही.

संगीत रंगभूमीवरचं त्यांचं योगदानही खूप मोठं आहे. त्यांनी नव्या-जुन्या संगीत नाटकांचे शेकडो प्रयोग केले. ते शेवटपर्यंत गायनसेवेत रममाण राहिले. त्यांनी उतारवयात गायलेलं गाणं मी ऐकलं आहे. पण त्या गाण्यातही त्यांनी तरुणवयात गायलेल्या गाण्यातली तडफ, उत्साह टिकून असल्याचं जाणवलं होतं. म्हणजेच शरीराचं वय पुढे गेलं असलं तरी, त्यांच्या गाण्यातल्या तजेला मात्र कायम होता. याचं मर्म नक्कीच त्यांच्या अनेक वर्षांच्या गानसाधनेत दडलं होतं. अन्य कलाकारांचं मनमुराद कौतुक करणं, हे रामदासजींचं स्वभाववैशिष्ट्य होतं. यातूनही त्यांच्या महान आणि पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडत असे.

भीमसेनजींनी संगीत दिलेल्या ‘धन्य ते गायनी’ या नाटकातली गाणी रामदासजींनी गायली होती. रामदासजींची सगळीच गाणी संस्मरणीय आहेत. त्यातही ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’ ही गाणी मला विशेष आवडतात. यातून अभिषेकीवुवांच्या चाली आणि रामदासजींचं गायन यांच्या मंगल मिलापाचा आनंद मिळतो. कार्यक्रमांच्या निमित्तानं बरेचदा माझी आणि त्यांची भेट होत असे. एका वैयक्तिक समारंभात त्यांची माझी मैफल आयोजित केली होती. माझ्या दृष्टीनं तो एक सुंदर योग होता. रामदासजींच्या अशा अनेक स्मृती कायम आपल्यासवे राहतील. त्यांना श्रद्धांजली…

Recent Posts

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

13 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

21 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

58 minutes ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

1 hour ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

3 hours ago