जि.प.अध्यक्षा वाढाण यांची शाळांना भेट

  108

पालघर: जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी ग्रामीण भागातील शाळांना भेटी देऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी वसई तालुक्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालागत असलेल्या कोली-चिंचोटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी वाढाण यांनी शाळेला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. कोली-चिंचोटी शाळेत एकूण २८६ विद्यार्थी शिकत असून केवळ ६ शिक्षक आहेत.


केवळ तीन वर्गखोल्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. वाढाण यांनी याची दखल घेतानाच नवीन इमारती साठीजागा उपलब्ध नसल्याने जुन्या शाळा इमारतीच्या जागीच नवीन इमारत घेणे आवश्यक असल्याने कार्यकारी अभियंता (स.शि.अ.) यांना इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी वैदेही वाढाण यांनी दिल्या. तसेच शाळेतील पोषण आहाराची पाहणी करून कोरोना प्रतिबंध पाळून आहार वाटपाच्या सूचना दिल्या.


यावेळी जि.प. सदस्य कृष्णा माळी, माजी सभापती महिला व बालकल्याण नमिता राऊत, प्र. उप शिक्षणाधिकारी जनाथे, प्र. कार्यकारी अभियंता शिंदे, गटशिक्षणाधिकारी वसई दवणे व इतर उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा वाढाण यांच्या या दौऱ्याचे स्वागत होत असून त्यांनी जिल्ह्यातील अतिग्रामीण भागातील शाळांना भेटी देऊन पाहणी करावी,अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत