ठाण्याच्या जॉर्डन सिक्वेराची भारतीय हवाईदलात निवड

मुंबई : भारतीय हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर ठाण्यातील बावीस वर्षीय जॉर्डन सिक्वेरा या युवकाची नुकतीच निवड झाली असून शहरात सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे. देश रक्षणात ठाणेकर युवक नेहमीच आघाडीवर राहिले आहेत, याचे हे एक उदाहरण आहे.
लहानपणापासूनच भारतीय हवाईदलात भरती होण्याच स्वप्न जॉर्डन पाहिलं होते, स्वप्नपूर्तीची तयारी तो शालेय जीवनापासूनच करत होता.औरंगाबाद येथील संस्थेत केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या एन डी ए परीक्षेची तयारी त्याने केली होती अगदी पहिल्याच प्रयत्नात तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला .



वाचन, खेळ आणि प्रवास या त्याच्या आवडी आहेत , यामुळेच आपली वायुदलात निवड झाली असे तो मानतो .वाचन आणि प्रवास आपलं जीवन समृद्ध करतात तर आपली शारीरिक क्षमता मानसिकता समृद्ध आणि कणखर बनते खिलाडूवृत्ती जोपासली जाते .अस त्याच वैयक्तिक मत आहे ,म्हणून तर तो तरुणांना वाचन तर कराच तसच खेळात भाग घ्या खेळत रहा अस आवाहन करतो .



जॉर्डन सिक्वेरा हा राष्ट्रीय पातळीवरचा बास्केटबॉलचा युवा खेळाडू आहे , आपल्या या आवडत्या खेळावरच प्रेम त्याने असेच अबाधित ठेवलं असून हैदराबाद येथील एअरफोर्स अकॅडमी मध्ये सुवर्ण व रजतपदक जिंकलं आहे .



जॉर्डनचे वडील लॉरेन्स सिक्वेरा आयटी प्रोफेशनल आहेत तर आई सौ लीना ही सिंघानिया शाळेत शिक्षिका आहे .ठाणे येथील मेजर गावंड यांनी जॉर्डनला भरती संदर्भात मार्गदर्शन अन प्रेरणा दिली , ठाण्यातील शौर्य डिफेन्स एकेडमी च्या संचालिका सौ वैशाली म्हेत्रे आणि सुहास भोळे यांनी जॉर्डनला मार्गदर्शन केले

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक