ठाण्याच्या जॉर्डन सिक्वेराची भारतीय हवाईदलात निवड

मुंबई : भारतीय हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर ठाण्यातील बावीस वर्षीय जॉर्डन सिक्वेरा या युवकाची नुकतीच निवड झाली असून शहरात सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे. देश रक्षणात ठाणेकर युवक नेहमीच आघाडीवर राहिले आहेत, याचे हे एक उदाहरण आहे.
लहानपणापासूनच भारतीय हवाईदलात भरती होण्याच स्वप्न जॉर्डन पाहिलं होते, स्वप्नपूर्तीची तयारी तो शालेय जीवनापासूनच करत होता.औरंगाबाद येथील संस्थेत केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या एन डी ए परीक्षेची तयारी त्याने केली होती अगदी पहिल्याच प्रयत्नात तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला .



वाचन, खेळ आणि प्रवास या त्याच्या आवडी आहेत , यामुळेच आपली वायुदलात निवड झाली असे तो मानतो .वाचन आणि प्रवास आपलं जीवन समृद्ध करतात तर आपली शारीरिक क्षमता मानसिकता समृद्ध आणि कणखर बनते खिलाडूवृत्ती जोपासली जाते .अस त्याच वैयक्तिक मत आहे ,म्हणून तर तो तरुणांना वाचन तर कराच तसच खेळात भाग घ्या खेळत रहा अस आवाहन करतो .



जॉर्डन सिक्वेरा हा राष्ट्रीय पातळीवरचा बास्केटबॉलचा युवा खेळाडू आहे , आपल्या या आवडत्या खेळावरच प्रेम त्याने असेच अबाधित ठेवलं असून हैदराबाद येथील एअरफोर्स अकॅडमी मध्ये सुवर्ण व रजतपदक जिंकलं आहे .



जॉर्डनचे वडील लॉरेन्स सिक्वेरा आयटी प्रोफेशनल आहेत तर आई सौ लीना ही सिंघानिया शाळेत शिक्षिका आहे .ठाणे येथील मेजर गावंड यांनी जॉर्डनला भरती संदर्भात मार्गदर्शन अन प्रेरणा दिली , ठाण्यातील शौर्य डिफेन्स एकेडमी च्या संचालिका सौ वैशाली म्हेत्रे आणि सुहास भोळे यांनी जॉर्डनला मार्गदर्शन केले

Comments
Add Comment

आता लोकल गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार; ३ महिने राहणार हे' प्लॅटफॉर्म बंद

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता एका मोठ्या जम्बो ब्लॉक चा

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

Rohit Shetty : बॉलिवूड हादरलं! ॲक्शन किंग अन् दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतील बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार; तो आला अन्...थेट

मुंबई : बॉलीवूडचे 'ॲक्शन किंग' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर

वाढत्या वायुप्रदूषणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

१८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या

मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि