जिल्ह्यात ३० टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण

  35

रत्नागिरी :देशभरात सुरू असलेला ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेकडून कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. शासनाने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले असून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजारांपैकी २० हजार ७६६ जणांना लस दिली आहे. आतापर्यंत तीस टक्के जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लसीकरण झाल्यामुळे कोरोना बाधितांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. ऑक्सीजनवरील आणि अतिदक्षता विभागातील बाधितांचा आकडा एक आकडीच आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दोन मात्रा शंभर टक्के नागरिकांनी घेण्यावर भर देण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी ७ लाख २८ हजार ७१० जणांनी दोन मात्रा घेतल्या आहेत. केंद्र शासनाकडून १५ ते १८ वयोगातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. आठवड्यातून बुधवारी आणि शनिवारी या वयोगटातील लाभार्थींना लस दिली जाते. नियमित केंद्रांबरोबरच शाळा, महाविद्यालयांमध्येही लसीकरणाची व्यवस्था केली आहे. शनिवारी सात हजार मुलांना लस देण्यात आली. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे ७१ हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत २० हजार ७६६ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.

लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाल्याच्या नोंदी आरोग्य विभागाकडे नाहीत. २००७ मध्ये जन्म झालेली मुले या लसीकरणासाठी पात्र ठरत आहेत. हा वर्ग सुरक्षीत करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी