राज्यातील सद्यस्थिती ‘अस्वस्थ’ करणारी

नवी दिल्ली: 'महाराष्ट्रातील 'परिस्थिती ही अत्यंत अस्वस्थ' करणारी आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणी सुनावणीदरम्यान, मंगळवारी, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा अलिकडेच नेतृत्व करणाऱ्या पोलीस दलावर विश्वास नाही आणि राज्य सरकारचा सीबीआयवर विश्वास नाही', असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासात राज्याने अनेक अडथळे निर्माण केल्याची माहिती सीबीआयने यावेळी सुप्रीम कोर्टात दिली.

सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील पुनीत बाली यांनी परमबीर सिंग बाजू मांडली. 'परमबीर सिंग यांना लक्ष्य केले जात आहे आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. पण राज्य सरकार सीबीआयच्या कार्यवाहीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे', असा दावा बाली यांनी केला. सुप्रीम कोर्टातील या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयची बाजू मांडली. 'ही घटनांची साखळी आहे, असे मेहता म्हणाले. तर या प्रकरणात सुप्रीम कोर्टाला लक्ष घालावे लागेल, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील डॅरियस खंबाटा यांनी केला.

हे तेच पोलीस दल आहे, ज्याचे तुम्ही नेतृत्व केले होते. पण आता पोलीस दलाच्या प्रमुखाचा त्याच पोलीस दलावर भरवसा राहिलेला नाही. प्रशासनावर विश्वास नाही... ही अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे, असे न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने म्हटले. तसेच हे प्रकरण शांततेच्या मार्गाने सोडवण्याची शक्यता आहे का? असा सवालही सर्व पक्षांना केला. देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासात राज्य सरकारकडून अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत. यामुळे सीबीआयचे काम कठीण होत असल्याचे मेहता यांनी नमूद केले.

ज्या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला गेला आहे, त्याच प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू केली आहे, असे परमबीर सिंग यांचे वकील बाल म्हणाले. या प्रकरणातील युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना या प्रकरणांमध्ये अटकेपासून संरक्षण दिले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जानेवारीला होईल.
परमबीर सिंग यांनी दिलेल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या चॅट ट्रान्सक्रिप्टचाही दाखला सीबीआयने सुप्रीम कोर्टात सुनावणी वेळी दिला.

परमबीर सिंग यांनी १६ सप्टेंबरला मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या दोन प्राथमिक चौकशींविरुद्धची परमबीर सिंग यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली होती. तसेच आपल्याविरुद्ध दाखल असलेले गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणीही परमबीर सिंग यांनी केली होती.
Comments
Add Comment

Workers Day : कामगार दिनानिमित्त महापालिका सफाई कामगारांचा गौरव महापालिकेचा डी विभागाने घेतला पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग, घन कचरा

Chhattisgarh Soldier News : छत्तीसगडमधील जवान शहीद; सुरुंग निकामी करण्याच्या कामादरम्यान मोठा स्फोट

छत्तीसगड : एकेकाळी नक्षलवाद्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात सुरुंग निकामी करण्याचे काम सुरू असताना

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! व्यावसायिक नंतर आता घरगुती सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

मुंबई : गेल्या १५ वर्षांत घरगुती गॅस (LPG Gas) सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्या दुपटीहून अधिक झाल्या

West Bengal Election 2026 : ईव्हीएम वाद पेटला! बंगालमध्ये १५ केंद्रांवर फेरमतदान सुरू; टेप लावून बटणे झाकल्याचा आरोप

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. परगणा

25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या

Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा