आयकरचा सागर कातुर्डे ‘भारत श्री’

  183

मुंबई :कोरोनाच्या महासंकटामुळे लांबणीवर पडलेल्या १३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव अर्थातच भारत श्री स्पर्धेत आयकर खात्याच्या सागर कातुर्डेने बाजी मारली. तामिळनाडूचा एम. सर्वानन उपविजेता ठरला. रेल्वे स्पोर्टसने सांघिक विजेतेपद पटकावले. तामिळनाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

‘भारत श्री’च्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबासाठी सागरसमोर तामिळनाडूचा एम. सर्वानन आणि आर. कार्तिकेश्वर यांचे आव्हान होते. पीळदार पोझेसनी जजेसना मोहित करताना सागरने पहिल्यांदा ‘भारत श्री’वर नाव कोरले. कोरोनामुळे नुकत्याच उझबेकिस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सागर खेळू शकला नव्हता. मात्र ‘भारत श्री’ स्पर्धेत तो आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उतरला. सागर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत फक्त आपल्या ८० किलो वजनी गटात विजेता व्हायचा, पण आज त्याने त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. किताबाच्या लढतीत दहा गटविजेते असले तरी त्याची खरी लढत तामिळनाडूच्याच सर्वानन आणि कार्तिकेश्वरशी झाली आणि या लढतीत त्यानेच बाजी मारली.
७० किलो वजनी गटात तौसिफ मोमीन हा खेळाडूच सोने जिंकू शकला. गतवर्षी महाराष्ट्र श्री ठरलेला महेंद्र चव्हाण हा ९०किलो वरील गटात दुसरा आला. याव्यतिरिक्त फिटनेस फिजीक गटात अचल कडवेने बाजी मारली.

या स्पर्धेत वैयक्तिक पुरस्कारांमध्ये बेस्ट पोझरचा पुरस्कार एस. कृष्णा रावने ( भारतीय पोस्ट) मिळवला. सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू म्हणून नितीन चंडिला याला (हरयाणा) गौरवण्यात आले.
Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता