पक्षभेद विसरून महिला सन्मानासाठी आवाज उठवावा

नवी दिल्ली, : सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाही, मग त्या कुठल्याही धर्माच्या असोत, अशी खंत व्यक्त करतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, या विरोधात पक्षीय राजकारण विसरुन सर्वांनी आवाज उठवायला हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालय आणि दूरसंचार विभागासोबत सक्रीय स्वरुपात काम करत आहे. तसेच लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून याला विरोध करण्यासाठी एकत्र यायला हवे असे आवाहनही इराणी यांनी केले. बुली बाई अॅप, अभिनेता सिद्धार्थचे सायना नेहवालविरोधातील आक्षेपार्ह ट्वीट तसेच दिल्लीतील निर्भया केससंदर्भात इराणी यांनी चर्चा केली. यानंतर महिलांना एका अॅपच्या माध्यमातून केवळ लैंगिक भावनेतूनच पाहिले जातये का ? असा सवालही त्यांनी केला.



सध्या महिलांची सरसकट एका विशिष्ट भावनेतून सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा धर्म पाहिला जात नाहीए. पण मी पोलिसांचे आभार मानेन की त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा मिळेल याची मला खात्री आहे. पोलीस आणि न्याय व्यवस्थेत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रकरणं समोर येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच या मुद्यावर लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरजही केंद्रीयमंत्री इराणी यांनी व्यक्त केली.



भारतात महिलांचे लग्नाचे वय वाढवणाऱ्या विधेयकाबाबत बोलताना इराणी म्हणाल्या की, मी संसदेत मुलींचं लग्नाचं वय २१व्या वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी केली तेव्हा मला देशभरातून पाठिंबा मिळाला. पण मुलींचे लग्नाच वय वाढवण्यामागे एका समाजावर गु्न्हेगारी ठपका ठेवण्याचा डाव असल्याच्या केवळ अफवा आहेत. ज्या लोकांना महिलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवायचे आहे तेच अशा अफवा पसरवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
..........

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या