पक्षभेद विसरून महिला सन्मानासाठी आवाज उठवावा

नवी दिल्ली, : सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाही, मग त्या कुठल्याही धर्माच्या असोत, अशी खंत व्यक्त करतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, या विरोधात पक्षीय राजकारण विसरुन सर्वांनी आवाज उठवायला हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालय आणि दूरसंचार विभागासोबत सक्रीय स्वरुपात काम करत आहे. तसेच लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून याला विरोध करण्यासाठी एकत्र यायला हवे असे आवाहनही इराणी यांनी केले. बुली बाई अॅप, अभिनेता सिद्धार्थचे सायना नेहवालविरोधातील आक्षेपार्ह ट्वीट तसेच दिल्लीतील निर्भया केससंदर्भात इराणी यांनी चर्चा केली. यानंतर महिलांना एका अॅपच्या माध्यमातून केवळ लैंगिक भावनेतूनच पाहिले जातये का ? असा सवालही त्यांनी केला.



सध्या महिलांची सरसकट एका विशिष्ट भावनेतून सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा धर्म पाहिला जात नाहीए. पण मी पोलिसांचे आभार मानेन की त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा मिळेल याची मला खात्री आहे. पोलीस आणि न्याय व्यवस्थेत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रकरणं समोर येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच या मुद्यावर लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरजही केंद्रीयमंत्री इराणी यांनी व्यक्त केली.



भारतात महिलांचे लग्नाचे वय वाढवणाऱ्या विधेयकाबाबत बोलताना इराणी म्हणाल्या की, मी संसदेत मुलींचं लग्नाचं वय २१व्या वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी केली तेव्हा मला देशभरातून पाठिंबा मिळाला. पण मुलींचे लग्नाच वय वाढवण्यामागे एका समाजावर गु्न्हेगारी ठपका ठेवण्याचा डाव असल्याच्या केवळ अफवा आहेत. ज्या लोकांना महिलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवायचे आहे तेच अशा अफवा पसरवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
..........

Comments
Add Comment

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे