कोरोनाची ही साथ कधी संपुष्टात येईल?

Share

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा वेग असाच वाढत राहिला तर तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव डॉ. रवी मलिक यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सध्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था सुरू आहे. ओमायक्रॉन हा कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा कमी घातक आहे. हा नवा विषाणू फुप्फुसांवर नव्हे तर श्वसनमार्गाला अधिक संसर्ग करतो. त्याची लक्षणे सौम्य असली तरी आपण योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. ओमायक्रॉनमध्ये देखील भविष्यात आणखी परिवर्तन होणार आहे. कोणतीही साथ ही तीन ते चार लाटांनंतर संपुष्टात येते, असा आजवरचा इतिहास आहे. मात्र कोरोनाचे नवनविन व्हेरिएंट वैद्यकीय तज्ज्ञांसाठी आव्हान ठरत आहेत.

डॉ. रवि मलिक म्हणाले की, कोरोना संसर्गाविषयी साऱ्या जगालाच नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. कोरोना विषाणूचे आणखी काही नवे प्रकारही संसर्ग फैलावू शकतात. त्यामुळे ही साथ कधी संपुष्टात येईल याबद्दल आताच काही सांगणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

Recent Posts

बेस्ट बसच्या तिकीट दरात दुप्पट वाढ

पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये  मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…

27 minutes ago

गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…

49 minutes ago

मुंबईतून कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…

1 hour ago

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…

2 hours ago

‘हवा प्रदूषणात’ भारताची स्थिती चिंताजनक

प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…

8 hours ago

मजबूत औद्योगिक धोरण हवे

उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…

8 hours ago